

CJI Suryakant
Esakal
भारताच्या न्यायव्यवस्थेत सध्या ५.४ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर शपथ घेतलेले नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रचंड संख्येला न्यायव्यवस्थेतील मूलभूत संरचनात्मक कमतेचा परिणाम म्हटले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी वैज्ञानिक, समन्वयात्मक आणि दूरगामी उपाययोजना आखण्याची दिशा स्पष्ट केली.