एअर स्ट्राईकवेळी ढग आल्यानेच रडारपासून वाचू शकलो : मोदी

एअर स्ट्राईकवेळी ढग आल्यानेच रडारपासून वाचू शकलो : मोदी

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईकची कारवाई केली. त्यानंतर आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, की ''हवामान खराब असल्याने आपले विमान रडारवर दिसणार नाही. त्यावेळी आकाशात सगळीकडे ढग पसरले होते. पाऊसही पडत होता. हीच बाब आमच्यासाठी फायदेशीर होती. त्यामुळे एअर स्ट्राईकची कारवाई करावी, असा सल्ला दिला गेला''.

न्यूज नेशन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, मी दिवसभर कामात व्यस्त होतो. त्यावेळी वार मेमोरिअलचे उद्घाटन होते. चुरुमध्ये रॅली काढली होती. बालाकोटच्या एअर स्ट्राईकचे काम आमच्या टीमने केले. रात्री 9 आणि त्यानंतर रात्री 12 वाजता आढावा घेतला. तेव्हा हवामान खराब असल्याची मोठी समस्या आमच्यासमोर होती. त्यानंतर मला अचानक एक सूचना मिळाली की आपण एअर स्ट्राईकची तारीख बदलायची का? त्यानंतर मी त्यांना सांगितले, की या हवामानातच आपण रडारपासून वाचू शकतो. आकाशात ढग आणि पाऊस पडत असल्याने हीच बाब आपल्यासाठी फायदेशीर आहे. 

दरम्यान, याबाबतचे ट्विट भाजपकडून करण्यात आले होते. मात्र, काही वेळानंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले. मात्र, माकपचे नेते सिताराम येच्युरी यांनी नवे ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com