CM The Yogshala : पंजाबमध्ये ‘सीएम दी योगशाला’ची सुरूवात

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये ‘सीएम दी योगशाला’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
Arvind Kejariwal and Bhagwant man
Arvind Kejariwal and Bhagwant mansakal
Summary

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये ‘सीएम दी योगशाला’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

चंडीगड - पंजाबमधील पतियाळा येथे आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये ‘सीएम दी योगशाला’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना, अमृतसर आणि फगवाडा या चार शहरांमध्ये चार शहरामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

‘सीएम दी योगशाला’ या उपक्रमांतर्गत शहरांतील उद्याने, सभागृहे अथवा गृहसंकुलांत तेथील नागरिकांसाठी राज्य सरकारच्या वतीने योग प्रशिक्षक पाठविण्यात येणार आहेत. यासाठी किमान २५ जणांचा गट असणे आवश्‍यक असणार आहे. या गटाच्या सोयीनुसार, सरकाच्या वतीने पाठविण्यात येणारा योग प्रशिक्षक त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या योगप्रशिक्षकाचे मानधन सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सरकारच्या वतीन एक भ्रमणध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी आपली विस्तृत माहिती दिल्यानंतर सरकारच्या वतीने तेथे योग शिक्षक पाठविण्यात येणार आहे.

पंजाबमधील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याने अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा’ असे आवाहन भगवंत मान यांनी केले. तसेच आगामी काळात हा उपक्रम पंजाबमधील सर्व शहरांत राबविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले.

हे आहेत योगाभ्यासाचे फायदे

  • भारतीय संस्कृतीनुसार योगाभ्यास हे मानवी क्षमतांचे पूर्ण विकसन करण्याचे शास्त्र

  • विविध आसने आणि प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यप्राप्ती

  • कोणत्याही खर्चाशिवाय अनेक रोगांवर प्रभावी उपचार शक्य

  • तणाव, नकारात्मकता यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त

  • एकाग्रता वाढविण्यासाठी योगाभ्यासाचा उपयोग

  • यासाठी अत्यल्प साधनांची आवश्‍यकता असल्याने, सर्व स्तरांतील नागरिकांना लाभ घेणे शक्य

राज्यपालांवर टीका

या कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांवर टीका केली. हा उपक्रम आधी दिल्लीत सुरू केला होता, मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यानंतर नायब राज्यपालांनी तो बंद करायला लावला असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com