
नवी दिल्ली : ‘‘पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत, ते अजूनही भारतात आहेत की सीमेपलीकडे पळाले, अशी सवालांची फैर कॉँग्रेसने झाडली आहे. मोदी सरकार नेमके काय लपवू पाहत आहे? जनतेला प्रचारकी भाषण नव्हे तर इमानदार उत्तर हवे आहे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या प्रवक्त्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केला.