शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

priyanka-gandhi
priyanka-gandhi

नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली. 

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकारांविरुद्धही गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल त्यांनी टीका केली.

“शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न केला जाईल, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात केंद्राच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठतील,” असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे. 

“पत्रकार व लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल करून, त्यांना धमकाविण्याचे प्रकार अत्यंत भयानक आहेत. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर, ती सरकारची जबाबदारी आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे,” असे ट्विट  प्रियांका गांधी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com