Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Lok Sabha Election: भाजप आणि मित्रपक्षांकडून वारंवारं मोदी 400 पार असं सांगण्यात येते मात्र विरोधकांकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते दरम्यान, आता पहिल्यांदाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील यावर काँग्रेस नेत्याने विधान केले आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू आहे. सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत असून आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. भाजप आणि मित्रपक्षांकडून वारंवारं मोदी 400 पार असं सांगण्यात येते मात्र विरोधकांकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते दरम्यान, आता पहिल्यांदाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील यावर काँग्रेस नेत्याने विधान केले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल. त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी हा दावा केला आहे. काँग्रेसने एवढा मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल. त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी हा दावा केला आहे. काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने एवढा मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी साहा म्हणाले की, 400 पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे.

वास्तविक इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून परतणार नाहीत. इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.

Lok Sabha Election
PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

माध्यमांशी बोलताना साहा म्हणाले, 'भाजप चुकीची आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवत आहे. ती आश्वासने पूर्ण करू शकलेली नाही. त्यामुळे हे सरकार घालवायचेच, असा निर्धार लोकांनी केला आहे. आता भारतात आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. 350 जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल.

Lok Sabha Election
PM Modi: पाकिस्तानलाही मोदींसारखा नेता... कोण आहे पंतप्रधानांचे कौतुक करणारा अब्जाधीश

दरम्यान यावर भाष्य करताना भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्जी म्हणाले की, यावेळी 400 पार करण्याचा नारा प्रत्यक्षात येईल कारण आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. इंडिया आघाडीचे नेते सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असतील तर आम्हाला काही अडचण नाही.

सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्रिपुरामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीसोबत आहेत. त्रिपुरामध्ये पूर्व त्रिपुरा आणि पश्चिम त्रिपुरा या दोन जागा आहेत. पश्चिम त्रिपुरा लोकसभा जागेसाठी आशिष साहा स्वतः रिंगणात असून त्यांची लढत राज्याचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याशी आहे. तर पूर्व त्रिपुरामध्ये भाजप उमेदवार कृतीदेवी देबबर्मा आणि सीपीआयएमचे आमदार राजेंद्र रेआंग यांच्यात आहे. गेल्या वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सीपीएम एकत्र लढले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com