'मोदी सरकारसाठी शेतकरी 'खलिस्तानी' तर उद्योगपती...'

farmer protest.jpg
farmer protest.jpg

नवी दिल्ली- सुधारित कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी कायद्यावरुन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा मोठ्या ताकदीने उपस्थित केला असून त्यांच्याकडून सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणत आहे तर भांडवलदार त्यांचे खास मित्र आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

राहुल गांधींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मोदी सरकारला विरोध करणारे विद्यार्थी राष्ट्रद्रोही आहेत. चिंतित नागरिक अर्बन नक्सली आहेत. स्थलांतरित मजूर कोरोनाचे वाहक आहेत. त्यांच्यासाठी बलात्कार पीडित कोणीच नाही, आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत... आणि उद्योगपती त्यांचे चांगले मित्र आहेत.

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनाचा मंगळवारी 20 वा दिवस आहे. शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहेत. जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही. तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी सरकारमधील काही मंत्री शेतकरी आंदोलनात खलिस्तानींचा पाठिंबा असल्याचा दावा केला. तर काहींनी हे आंदोलन करत असलेले शेतकरी नसल्याचा आरोप केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती रोष वाढला आहे. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com