कन्हैयाने स्पष्ट केलं काँग्रेस प्रवेशाचं कारण; म्हणाला, "मोठं जहाज जेंव्हा..."

कन्हैयाने स्पष्ट केलं काँग्रेस प्रवेशाचं कारण; म्हणाला, "मोठं जहाज जेंव्हा..."

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी नेता म्हणून ओळख असणारा कन्हैया कुमार आणि गुजरातमध्ये अपक्ष आमदार असलेला जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज भगतसिंग यांच्या जयंतीचं औचित्य साधत या दोघांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कन्हैयाने लाल तर जिग्नेश मेवाणीने निळा शर्ट घालत प्रतिकात्मकरित्या आपल्या वैचारिकतेचं दर्शन घडवत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने आपल्या पक्षप्रवेशामागची भूमिका विषद केली आहे.

कन्हैयाने स्पष्ट केलं काँग्रेस प्रवेशाचं कारण; म्हणाला, "मोठं जहाज जेंव्हा..."
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कन्हैया कुमारने म्हटलंय की, आमचं हे म्हणणं आहे की आज देशाला भगतसिंगांच्या वीरतेची गरज आहे. गांधींच्या एकतेची गरज आहे. आंबेडकरांच्या समानतेची गरज आहे आणि हाच विचार जपण्याची गरज आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. मला असं जाणवतंय की, या देशात काही लोक, विचारधारा या देशातील चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या विचारधारेला तुम्ही आपोआपच ओळखून जाल. आम्ही आमचे विरोधक ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही असा निर्णय केला की या देशातील सर्वांत मोठी लोकशाही पक्षामध्ये प्रवेश करायचा. हेच या देशातील अनेक तरुणांन वाटतंय.

कन्हैयाने स्पष्ट केलं काँग्रेस प्रवेशाचं कारण; म्हणाला, "मोठं जहाज जेंव्हा..."
कन्हैया-जिग्नेश यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढे त्याने म्हटलंय की, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते. कारण देशात सध्या पंतप्रधान फक्त नावाला आहेत. काँग्रेस हा पक्ष सर्वांत मोठा आणि जुना पक्ष आहे. या पक्षाला महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, मौलाना आझाद यांचा वारसा आहे. विरोधक कमकुवत झालाय म्हणताना ही गोष्ट फक्त विरोधकांसाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी चिंतेची ठरते कारण अशा परिस्थितीमध्ये हुकुमशाही वाढते. जर सर्वांत मोठ्या जहाजाला वाचवलं नाही तर छोटे नावे देखील बुडण्याची शक्यता असते. मी ज्या पक्षातून आलो आहे मी त्यांचे आभार मानतो.

मी असं मानतो की, देशातल्या वैचारिक संघर्षाला काँग्रेस पक्षच नेतृत्व देऊ शकते. मी देशातल्या तरुणांना आवाहन करतो की, आता गप्प बसण्याची वेळ नाही. आता आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे मैदानात उतरा. आज काँग्रेस पार्टी वाचली तर लाखों तरुणाची आकांक्षा वाचेल, याच आशेसह मी हा पक्ष प्रवेश करतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com