नवी दिल्ली - ‘काँग्रेसने देशाला विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली,’ असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केला..भारत-अमेरिका व्यापार करार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, शेतकऱ्यांना आणि १.४ अब्ज जनतेला विकल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. ‘राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प नीट न वाचताच आरोप केले आहेत.२०१३ मध्ये बाली येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेत काँग्रेस सरकारने केलेल्या दोन करारांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली,’ असा आरोप सीतारामन यांनी केला. काँग्रेसने व्यापार सुलभीकरण आणि अन्नधान्य साठवणुकीबाबत केलेल्या करारांमुळे जानेवारी २०१७ पासून भारतात शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करता येणार नाही आणि गरिबांना अन्नधान्य देता येणार नाही, अशी अडचण निर्माण झाली..शेतकऱ्यांना हमीभाव देऊनही खरेदी करता येत नव्हती. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जागतिक व्यापार परिषदेत ठाम भूमिका घेत ही अडचण दूर केली, असे सीतारामन म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्न सुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या तरतुदी केल्या असून विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सीतारामन यांनी केला. डेटा भारतातच राहावा आणि भारतीय तरुणांना रोजगार मिळावा यासाठी देशांतर्गत ‘एआय’ क्षमता मजबूत करण्यासाठी आणि चांगल्या सेवा देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून डेटा सेंटरला प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील, असे त्या म्हणाल्या..केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये स्थिर भांडवली गुंतवणूक घटत आहे. कम्युनिस्ट सत्ताधारी राज्यांनी उद्योग गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत, असा आरोप सीतारामन यांनी केला तर काही राज्यांना निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. केंद्राने वित्त आयोगाच्या शिफारशीप्रमाणेच निधी दिला असून राज्यांच्या कर वाट्यात कोणतीही कपात केलेली नाही, असे त्यांनी सांगितले..ठळक मुद्देदेशातील डेटा भारतातच राहावा आणि भारतीय तरुणांना रोजगार मिळावा म्हणून डेटा सेंटरना प्रोत्साहनएकूण कर महसूल ४४.०४ लाख कोटी. एकूण खर्च ५३.४७ लाख कोटी.भांडवली खर्च १२.२२ लाख कोटी २०२५-२६ च्या सुधारित अंदाजापेक्षा ११.५ टक्के जास्त वैद्यकीय पर्यटन वाढवण्यासाठी पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रविविध क्षेत्रांत वाढीसाठी राज्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा अर्थसंकल्पाचा उद्देशतरुणांना आवश्यक कौशल्ये देण्यावर भरदोनशे पारंपरिक एमएसएमई क्लस्टर (लुधियाना, जालंधर, कानपूर, बंगाल, बिहार) यांना निधी देऊन आधुनिक करणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.