इटानगर : अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात आणखी एका महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून सहा हजार ६२१ कोटी ६२ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. या प्रकल्पांतर्गत एकूण २६५.४९ किलोमीटर रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९१३ वरील आठ भागांच्या निर्मितीसाठी केंद्राकडून निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत या महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची निर्मितीही केली जाणार आहे. या या प्रकल्पाचे विविध टप्पे करण्यात आले असून पॅकेज एकच्या अंतर्गत बोमडिला-नाफ्रा-लाडा विभागात रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच पॅकेज एक, तीन आणि पाच अंतर्गत हुरी-तलिहादरम्यान रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. तर दोन पॅकेज अंतर्गत बिले-मिगिंग दरम्यानच्या रस्त्याच्या निर्मिती करण्यात येणार आहे. पॅकेज दोन आणि चार खारसांग- मियाओ- गांधीग्राम-विजयनगर येथील मार्गाचे निर्माण करण्यात येणार आहे.
या महामार्गाच्या निर्मितीमुळे सीमावर्ती भागात दळणवळण सोपे होणार असून या भागातील विकासालाही गती मिळेल असे गडकरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या निर्मितीमुळे राज्यांतील नद्यांच्या खोऱ्यामध्ये दळणवळण सुलभ होणार असून याचा फायदा राज्यात जलविद्युतप्रकल्प उभारण्यासाठी होईल, तसेच या महामार्गाच्या निर्मितीमुळे अरुणाचल प्रदेशातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. असा दावा नितीन गडकरी यांनी केला. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.