

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी घरातले लोक रिसेप्शनची तयारी करण्यात गुंतले होते. सकाळी बराच वेळ झाला तरी नवविवाहित दाम्पत्य रूममधून बाहेर आले नव्हते. त्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला तरी उत्तर आलं नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा दोघांचेही मृतदेह कुटुंबियांना दिसल्यानं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अयोध्येत सहादतगंज मुरावन टोला इथं ही घटना घडलीय.