Couple Reaches Supreme Court for Marriage
esakal
उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पळून दिल्लीत पोहोचलेल्या एका जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑनर किलिंगच्या भीतीमुळे हे जोडपं घर सोडून थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होतं. अशा जोडप्यांचे विवाह सर्वोच्च न्यायालयात होतो आणि त्यानंतर त्यांना मुख्य न्यायमूर्तींच्या निवासस्थानी नेले जाते, असा त्यांचा समज झाला होता. एका वकिलांना दोघे दिसल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.