

कर्नाटकात उत्तर कन्नड जिल्ह्यात गायींच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. याच पार्श्वभूमीवर प्रभारी मंत्री मनकल वैद्य यांनी मोठं विधान केलंय. गो तस्करीत सहभागी असल्याचं आढळल्यास आरोपींना भरचौकात किंवा रस्त्यावर गोळी मारली जाईल असं मंत्री मनकल वैद्य म्हणालेत. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना होऊ देणार नाही. प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हितांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत असल्याचंही वैद्य म्हणाले. होन्नावर इथं एका गर्भवतीय गायीच्या बळीच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.