Mother Kills Three Children
esakal
बंगळूर : बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुच्छलगुड्ड गावात कौटुंबिक वादातून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रूपा नावाच्या महिलेने आपल्या तीन लहान मुलांना गळफास देऊन ठार (Mother Kills Three Children) केल्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला.
रूपाने समृद्धी (वय ५), प्रीतम (४) आणि सुक्षित (२) या तीन मुलांना गळफास लावून ठार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिने डिझेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. डिझेलमुळे प्रकृती बिघडल्याने रूपाला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.