सरकारचा निर्णय स्तुत्य; पण कायदा रद्दच करावा; इरोम शर्मिला

‘अफ्स्पा’ हा दडपशाही करणारा कायदा असून तो कधीच बंडखोरीवरील उपाय असू शकत नाही
इरोम शर्मिला
इरोम शर्मिलाsakal

कोलकता : केंद्र सरकारच्या सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्याविरोधात (अफ्स्पा) सोळा वर्षे उपोषण करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयाचे स्वागत केले असले तरीसुद्धा हा कायदा तातडीने रद्द करावा अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. हा कठोर आणि वसाहतकालीन कायदा तातडीने मागे घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आयर्न लेडी अशी ओळख असणाऱ्या शर्मिला यांनी ‘अफ्स्पा’ हा दडपशाही करणारा कायदा असून तो कधीच बंडखोरीवरील उपाय असू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने ‘अफ्स्पा’चे कार्यक्षेत्र घटविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे मी स्वागतच करते. योग्य दिशेने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे पण हे काही यावरील उत्तर असू शकत नाही. हा कायदाच पूर्णपणे रद्द करण्याची गरज आहे, असे त्यांनी दूरध्वनीवरून ‘पीटीआय’शी साधलेल्या संवादामध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com