बिहारमध्ये काय पडसाद उमटले झारखंडच्या पराभवाचे वाचा

nitish kumar
nitish kumar

पाटणा - झारखंड निवडणुकीतील पराभवाचे पडसाद बिहारमध्येही पडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने ‘बिहारमध्ये नितीशकुमार नको,’ अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. यासाठी नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, झारखंडमधील पराभवानंतर संयुक्त जनता दलानेच (जेडीयू) भाजपला सल्ले देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. 

‘भाजपने आपल्या मित्रपक्षांशी समन्वय राखून त्यांच्यासह झारखंडमध्ये निवडणूक लढविली असती तर हा दिवस दिसला नसता,’ अशा कानपिचक्‍या ‘जेडीएस’ने दिल्या आहेत. यावरूनच बिहारच्या राजकारणाचा रोख बदलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

झारखंडमधील भाजपचा मित्रपक्ष ऑल झारखंड स्टुडंट युनियन (एजेएसयू) यांची युती न होता, हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तसेच बिहारमधील भाजपचे आघाडीतील पक्ष ‘जेडीएस’ आणि लोकशाही जनता पक्षांमध्येही बिहारमध्ये युती होऊ शकली नव्हती. तेथे या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नसले तरी, ‘जेडीएस’चे प्रवक्ते संजयसिंह यांनी भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना बरोबर घ्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com