

CJP Protest
ESakal
विनोद राऊत
मुंबई : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. १२ वर्षांच्या राजकारणातील केंद्र सरकारला बसलेला हा सर्वांत मोठा धक्का आहे. राष्ट्रीय राजकारणावर याचे व्यापक परिणाम होऊन दिशा बदलेल, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे. यापुढे केंद्र सरकारला असंख्य आंदोलनांचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.