केंद्र सरकारच्या नैतिकतेवर विश्वास नाही - प्रियंका गांधी

PM मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiTeam esakal

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. त्यानंतर देशभरातून या निर्णयावर प्रतिक्रीया येत आहेत. आगामी काळात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

Priyanka Gandhi
काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर

सरकार शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही म्हणत होते, शेतकऱ्यांच्या हत्या होत होत्या, त्यांना अटक केली जात होती, ते कुणी केलं..तुमच्याच सरकारने केलं. त्यामुळे आपल्यावर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी केला आहे. शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावं लागलं आहे, मात्र सरकारच्या नैतिकतेवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही अशा भावना यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केल्या.

Priyanka Gandhi
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

शेतकरी आज वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतोय, त्यांच्या समस्या समजून, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील त्या यावेळी म्हणाल्या. आता पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली, सर्व विरोधी पक्षांनी समर्थन दिलं असं म्हणत त्यांनी या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना वंदन केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com