दोवाल यांनी दिली होती अजहरला 'क्‍लीन चिट' 

Ajit Doval
Ajit Doval

नवी दिल्ली (पीटीआय) : 'जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता, असा दावा विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. दोवाल यांनी या मुलाखतीत अजहरला "क्‍लीन चिट'ही दिली होती, असे सांगत कॉंग्रेसने आज पुन्हा सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

भाजपवर तोफ डागताना कॉंग्रेसने आज दोवाल यांच्या 2010 मधील मुलाखतीचा हवाला देत म्हटले आहे की, अजहरला तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे राजकीय होता, असा खुलासा दोवाल यांनी संबंधित मुलाखतीत केला होता. दोवाल यांनी अजहरला "क्‍लीन चिट' दिली होती. त्यामुळे पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची बिजे त्यांनीच रोवली होती, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला.

भाषणात मसूदचा उल्लेख "अजहरजी' केल्याबद्दल भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. राहुल यांनी उपहासातून केलेल्या विधानाचा भाजप जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावत आहे, असे प्रत्युत्तर सुरजेवाला यांनी दिले. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुरजेवाला यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, अजहरची सुटका करण्याचा निर्णय तत्कालीन भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला होता. तसेच, दोवाल यांनी अजहरला क्‍लीन चिटही दिली असल्याचे मुलाखतीत म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर अजहरची मुक्तता केल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील पर्यटनामध्ये 200 टक्‍क्‍यांची वाढ झाली, असे वक्तव्यही दोवाल यांनी केले होते. हे देशद्रोही कृत्य होते, असे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मान्य करणार का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com