कोरोनानं चिंता वाढवली! अनेक राज्यांत ३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेज बंद, परिक्षाही स्थगित

कोरोनानं चिंता वाढवली! अनेक राज्यांत ३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेज बंद, परिक्षाही स्थगित

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच गोष्टींना ब्रेक लागलाय. देशातील अनेक राज्यात, शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशांत ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे अनेक शहरांतील आणि राज्यातील शाळा-कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय काही राज्यातील बोर्ड परिक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि मध्यप्रदेशसह अनेक राज्यात लॉकडाउन आणि रात्रीची संचारबंदी लावली आहे. देशातील काही राज्यांच्या परिस्थितीवर नजर मारुयात....  

पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत शाळा बंद - 
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंजाब सरकारनं ११ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि सर्व शिक्षण संस्था ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल कॉलेज सुरु राहणार आहेत. राज्यातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यासोबत चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, हॉटेल, रेस्तारँट आणि किराना मालाची दुकानं रविवारी बंद राहतील. त्यासोबतच कोणत्याही कार्यक्रमात १० पेक्षा जास्त नातेवाईक एकत्र येऊ शकत नाहीत.  

भोपाळ, इंदौर आणि जबलपूरमध्ये कशी आहे परिस्थिती? 
मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून मध्य प्रदेश सरकारनं ३१ मार्चपर्यंत भोपाळ, इंदौर, आणि जबलपुरमधील शाला-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या तिन्ही शहरात रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. अत्यवशक सेवा आणि उद्योगांना सुट देण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.  

हेही वाचा :

पुडुचेरीमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा बंद -
पुडुचेरी सरकारनं पहिलीपासून आठवीपर्यंतच्या शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचं, सरकारकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई या सर्वांनाच हा नियम लागू होणार आहे. 

पुढील आदेशापर्यंत तामिळनाडूतील शाळा बंद - 
कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून तामिळनाडू सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यातील ११ वी पर्यंतच्या विद्यार्थांना शाळेत न येण्याचा आदेश दिला आहे. सरकारनं  शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षण सुरु राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com