नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकशाहीची हत्या करून भारतीय अर्थव्यवस्थेला आयसीयूत पोहचविले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन काँग्रेस करणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे उपस्थित राहणार आहेत.
या रॅलीला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाकडून भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. भारताची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहचविण्यात आली असून, लोकशाहीची होत असलेल्या हत्येविरोधात मी बोलणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.