

Kerala Road Accident
ESakal
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या जोरदार धडकेत कारचा चक्काचूर झाला असून जागीच ८ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.