राज्यघटनाविरोधी घटकांशी लढा: सोनिया गांधी

sonia gandhi
sonia gandhi

नवी दिल्ली - भारताचे सामर्थ्य हे आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (गुरुवार) केले. "या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व नष्ट करणाऱ्या घटकांशी' लढण्याचे आवाहनही गांधी यांनी यावेळी केले.

"भारताचे खरे सामर्थ्य हे असमानता व अन्यायाविरोधातील संघर्ष आणि आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये सामावलेले आहे. या घटनात्मक मूल्यांच्या संरक्षण व संवर्धनाप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठीचा आजचा दिवस आहे. राज्यघटनेच्या निर्मिती करणाऱ्या थोर विचारवंतांसह, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक व भारतीय संघराज्याचे संस्थापकांना माझी आदरांजली... भारताच्या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या घटकांविरोधात प्रत्येक भारतीय नागरिकाने लढण्याची आवश्‍यकता आहे,'' असे गांधी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com