पाच राज्यातील निवडणुका जाहीर; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला
Election Commission
Election Commissionesakal

निवडणूक आयोगाने (Election Commission) आज पत्रकार परिषदेमध्ये पाच राज्यातील मतदानाच्या तारखा जाहीर केल्या असून, पाच ही राज्याची १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात (Goa)१४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये (Manipur)पहिल्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीला होणार असून, दुसरा टप्प्यातील मतदान ३ मार्चला होणार आहे. ही निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी पर्यंत आहे. तर अर्जाची छाननी २९ जानेवारीला आहे. ३१ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.१० फेब्रुवारी ते १० मार्च या एका महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. (5 states Assembly Elections declared By EC)

दहा मार्चला उत्तर प्रदेशमध्ये योगींचे सरकार येणार का? गोव्यात भाजपची सत्ता राहणार का, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाला सत्ता मिळणार, समाजवादी पक्षाचे काय होणार, प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे नेमके काय होणार या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मिळतील. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, यातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

Election Commission
Assembly Elections 2022 : सभा, रॅली, पदयात्रांवर 15 जानेवारीपर्यंत बंदी

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

निवडणूक जाहीर पण प्रचाराला बंदी

15 जानेवारी पर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. अशी अट निवडणूक आयोगाने घातली आहे, यामध्ये रोड शो, सभा, कोपरा सभा, बाईक रॅली करता येणार नाही. हा प्रचार फक्त डिजिटल स्वरूपात करता येणार आहे.स्थिती बघून पुढचा निर्णय घेतला जाईल अस स्पष्ट आयोगाने केले आहे.

Election Commission
निवडणुकीपूर्वीच डीजीपींची उचलबांगडी; चन्नी सरकारचा मोठा निर्णय

सात टप्प्यात होणार निवडणुका

2017 मध्ये ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याप्रमाणेच यावेळच्या निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका मागे सात टप्प्यामध्ये झाल्या होत्या. त्याच पद्धतीने यावेळी निवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये 117 मतदार संघ आहेत, मात्र या ठिकाणची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड (Panjab,Goa Uttarakhand) या मतदारसंघाची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. तसेच मणिपूरची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.

कोरोना संदर्भात निर्बंध

जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक कर्मचारी कामावर हजर राहू शकणार नाहीत.सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच कर्मचारी कामावर रुजू होतील.

राजकीय पक्ष कोणत्या पद्धतीने या नियमाची अंमलबजावणी करतात आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये निवडणूक कशी निर्धोकपणे पार पडते हे दहा मार्चला कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com