
लखनौ - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने (Flood) हाहाकार माजवला आहे. बाराशेहून अधिक गावांमधील पाच लाख लोकांना पुराचा फटका (Loss) बसला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशात काल दिवसभरात सरासरीपेक्षा १५४ टक्के अधिक, म्हणजे १३.१ मिमी पाऊस पडला. प्रयागराज, चित्रकूट, कौसंबी, प्रतापगड, बस्ती, गोंडा, सुल्तानपूर, श्रावस्ती, लखनौ, रायबरेली आणि फतेहपूरसह ११ जिल्ह्यांमध्ये काल दिवसभरात २५ मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला.
उत्तर प्रदेश राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बदायूँ, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, बलिया आणि गाझीपूर या जिल्ह्यांमध्ये गंगेने पातळी ओलांडली आहे, तर औरारिया, हमीरपूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये यमुनेने विक्राळ रुप धारण केले आहे. याशिवाय, बेटवा, शारदा आणि कुनो या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
या सर्व ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत २१ हजार रेशन किट आणि दीड लाख लाखांहून अधिक जेवणाची पाकिटे वाटण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासह इतर काही बचाव दलांची एकूण ५९ पथके मदतकार्य करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.