Covid-19: दिलासादायक! रुग्णांचा आकडा वाढतोय; पण... 

good news,  coronavirus cases, corona
good news, coronavirus cases, corona

नवी दिल्ली :  देशात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा वाढत असून परिस्थिती आवाक्यात आणत असताना सरकार आणि प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला आकडा वाढत असला तरी जीवघेण्या विषाणूचा भारतातील मृत्यूदर हा चिंता कमी करणारा असाच आहे.  भारतात कोरोना विषाणू फॅसिलिटी रेट (CFR) शुक्रवार को 2.84 टक्के इतका आहे. मागील दिड महिन्यात पहिल्यांदा CFR (कोरोनाची लागण झालेल्या रुग्णापैंकी मृत पावणाऱ्या रुग्णांची टक्केवारी) 3 टक्के पेक्षा कमी नोंदवला गेला आहे. 

यापूर्वी 7 एप्रिल रोजी CFR कमी होता पण यावेळी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही केवळ 5,194 इतकाच होता. सध्याच्या घडीला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा लाखाच्या घरात पोहचला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारच्या घरात पोहचल्यापासून CFR रेटही वाढत असल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली होती. मेच्या सुरुवातीला मृत्यू दर हा 3.4 टक्के इतका होता. कोरोनाची लागण झालेल्या 100 पैकी जवळपास 3 रुग्ण दगावत होते. हा आकडा आता 3 टक्केहून कमी झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून मृत्यू दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.  24 मे रोजी CFR 2.89 टक्के,  25 मे 2.87 टक्केवरुन शुक्रवारी हा दर  2.84 टक्केवर आला आहे. 
पश्चिम बंगालमध्ये मृत्यू दर एकूण राष्ट्रीय मृत्यूदरापेक्षाही अधिक आहे. याठिकाणी 100 कोरोनाग्रस्तांपैकी जवळपास 6 लोकांचा मृत्यू होत आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये 10 टक्के इतक्या सर्वोच्च मृत्यू दराची नोंद झाली होती. आता यात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 
गुजरातमध्ये मृत्यूदरात होतेय वाढ

गुजरातमध्ये मृत्यू दर चिंताजनक असा आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच याठिकाणच्या कोरोनाग्रस्तांपैकी जवळपास6 टक्के लोकांना मृत्यूच्या जाळ्यात सापडत आहे. पश्चिम बंगालमध्ये मृत्यू दरात घट होत आहे तर गुजरातमध्ये याउलट मृत्यू दर वाढतानाचे चित्र आहे.  मेच्या सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये  CFR 5.8 टक्के इतका होता. आता तो 6 टक्केहून अधिक आहे.  
महाराष्ट्र-मध्य प्रदेशमधूनही समाधानकारक बातमी!

मध्य प्रदेशमध्ये मेच्या सुरुवातीला CFR 6 टक्के इतका होता. यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून हा दर आता  4.3 टक्के इतका कमी झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मेच्या सुरुवातीला 100 कोरोनाग्रस्तांपैकी 4 जणांना आपला जीव गमावत होते. यात सुधारणा झाली असून हा आकडा आता 3.3 टक्क्यांवर पोहचला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com