Gujarat Love Story : अखेर मरणानंतर दोघांचं लग्न लागलं; अशी पूर्ण झाली 'ती' प्रेमकहाणी!

घरचे तयार झाले नाहीत म्हणून या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Gujarat Love Story
Gujarat Love StorySakal

देशाच्या विविध भागातून, परदेशांमधून अनेक प्रेमकथा तुम्ही ऐकल्या असतील. पण गुजरातमध्ये एक अजब प्रेमकथा पाहायला मिळत आहे. मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर एका प्रेमीयुगुलाचा पुतळा त्यांच्या परिवाराने उभारला आहे.

ही प्रेमकथा आहे गुजरातमधल्या तापी इथली. गुजरातमधल्या गणेश आणि रंजना या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांनी आपल्या लग्नासाठी घरच्यांना तयार करण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांना य़श आलं नाही. अखेर त्यांनी आशा सोडली आणि ऑगस्ट २०२२ मध्ये या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर त्यांच्या घरच्यांना वाटलं की आपल्यामुळेच हे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ घरच्यांनी या दोघांचे पुतळे उभारले. या दोन्ही पुतळ्यांचं विधिवत लग्न लावण्यात आलं.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

मुलीचे आजोबा भीमसिंग पडवी यांनी सांगितलं की, हा मुलगा आमच्या नात्यातलाच होता. त्यामुळेच आम्ही दोघांचं लग्न लावून द्यायला तयार नव्हतो. पण आम्हाला लक्षात आलं की या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. म्हणून आमच्या दोन्ही परिवारांनी अशा प्रकारे पुतळे उभारून त्यांचं लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला.

आता या जोडप्याच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणूनच आपण हे लग्न लावून दिल्याचं या दोघांच्याही परिवाराने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com