मोरबी : गुजरात राज्यातील मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल कोसळल्याने जवळपास १३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण बेपत्ता असून त्यांच्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढत असून राजकोट येथील खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदरिया यांच्या कुटुंबातील १२ सदस्य या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत.
(Gujrat Bridge Collapse Latest Updates)
दरम्यान, कुंदरिया यांचे कुटुंबीय छट पूजेच्या निमित्ताने केबल पुलावर गेले होते. तर या घटनेत त्यांच्या कुटुंबातील जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांनी बोलताना सांगतलं की, "माझ्या बहिणीच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू या अपघातात झाला. त्यामध्ये २ लहान मुलांचा सामावेश आहे. बचावकार्य सुरू असून मच्छू नदीत बोटी दाखल केल्या आहेत" असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत पूलावरील अनेक लोक नदीत पडले. या दुर्घटनेत अनेक जण नदीत वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सूरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.