...तर हार्दिक पाणीही सोडून देईल; पाटीदारांचा इशारा

hardik patel
hardik patel

अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे संयोजक मनोज पनारा यांनी केली. 

'हार्दिकची तब्येत ही बिघडत चालली आहे, पण गुजरात सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही. पुढील 24 तासात सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत, तर हार्दिक पाणी पिणेही बंद करेल आणि एकदा पाणी पिणे बंद केल्यावर जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत तो पाणी पिणार नाही. आम्हाला व आमच्या सर्व समाजाला त्याची काळजी आहे व सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. पण सरकार या उपोषणाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत आहे.' असेही पनारा यांनी सांगितले. 

मंगळवारी (ता. 4) गांधीनगर येथे झालेल्या बैठकीत पाटीदार समाजाचे अधिकारी व सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. पण सरकार आपण चर्चा सुरू करणार असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत आहे. सरकारने चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले, पण आता हार्दिकच्या उपोषणाच्या ठिकाणी चर्चेसाठी कोणीच का जात नाही, असा सवाल आंदोलनाच्या संयोजकांनी उपस्थित केला. हार्दिक पटेल यांनी 25 ऑगस्टला सुरू केलेल्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाटीदार समाजाला आरक्षण अशा अनेक मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com