रजनीकांत अशिक्षित, तमिळनाडूतील जनता हुशार: स्वामी

Subramanian Swamy
Subramanian Swamy

नवी दिल्ली - सिनेअभिनेते रजनीकांत यांनी आज आपल्या पक्षाची घोषणा कोणताही तपशील किंवा कागदपत्रांची पूर्तता न करता केली आहे. रजनीकांत हे अशिक्षित आहेत, अशी टीका भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्याची स्पष्ट घोषणा आज (रविवार) चेन्नईत केली. तमिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र पक्ष स्थापून लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधानसभेच्या सर्व जागांवर आपला पक्ष उमेदवार उभे करेल, असेही त्यांनी सांगितले. 'सत्य, कार्य आणि वाढ हे आपल्या पक्षाचे तीन मंत्र असतील,' असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशावर बोलताना स्वामी म्हणाले, की रजनीकांत यांनी फक्त राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे बाकी काही माहिती नाही. ते एक अशिक्षित व्यक्ती असून, माध्यमांनी त्यांना मोठे केले आहे. तमिळनाडूतील जनता हुशार असून, ते योग्य निर्णय घेतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com