Fence on Myanmar Border: म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा केंद्राचा निर्णय; मुक्त संचारावरही बंदी

Fence Myanmar Border End Free Movement: भारत-म्यानमार सीमेवर संपूर्णपणे कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्यानमार आणि भारतामध्ये लोकांच्या होणाऱ्या मुक्त संचारावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
Fence Myanmar Border
Fence Myanmar Border

नवी दिल्ली- म्यानमार संबंधात गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत-म्यानमार सीमेवर संपूर्णपणे कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्यानमार आणि भारतामध्ये लोकांच्या होणाऱ्या मुक्त संचारावर देखील बंदी घालण्यात आली आहे.(home minister amit shah announces To Fence Myanmar Border End Free Movement Into India)

म्यानमारमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरु आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक भारतात शरण घेत आहेत. माहितीनुसार, मागील तीन महिन्यात म्यानमारच्या जवळपास सहाशे सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. शिवाय मणिपूर राज्याची सध्याची स्थिती तणावाची आहे. त्यामुळे देखील सीमेवर लक्ष ठेवणं आवश्यक बनले आहे.

Fence Myanmar Border
म्यानमार : आंग सान स्यू की यांना 5 वर्षांची शिक्षा

माहितीनुसार, पश्चिमी म्यानमारमधील रखाईंनमध्ये जातीय सशस्त्र गट अराकान आर्मीच्या कट्टरतावाद्यांनी सैनिकांच्या तळांवर ताबा मिळवला होता. त्यानंतर पलायन केलेल्या सैनिकांनी मिझोरामच्या लांग्टलाई जिल्ह्यात आश्रय घेतला होता. दुसरीकडे, मणिपूरमधील अशांततेसाठी म्यानमारमधीस कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचं सांगितलं जातं.

Fence Myanmar Border
Smart Fencing : भारत म्यानमार सीमेवर का बांधतोय स्मार्ट फेंस, जाणून घ्या सामान्य कुंपणापेक्षा यात वेगळं काय आहे?

निर्णय कशामुळे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार असल्याचं जाहीर केलंय. वांशिक संघर्षामुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती आहे. त्यामुळे अनेक सैनिक भारतात पळून येऊ लागले आहेत. त्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. यापुढे भारत-म्यानमार सीमा बांगलादेशच्या सीमेप्रमाणे संरक्षित केली जाईल, असं गृहमंत्री म्हणाले.

दोन्ही देशांमध्ये सध्या मुक्तपणे येण्या-जाण्याला मोकळीक आहे, पण यापुढे सीमेवर राहणाऱ्या लोकांना व्हिसा आवश्यक करण्यात येणार आहे. भारत आणि म्यानमार सीमेवर राहणाऱ्या लोकांमध्ये कौटुंबिक आणि वांशिक नाते आहे. त्यामुळे १९७० मध्ये मुक्त संचाराचा कायदा करण्यात आला होता.पण, सध्याची स्थिती पाहता हा कायदा रद्द करण्यात येण्याचे संकेत आहेत. दरम्यान, म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोर शक्तींमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु आहे. त्यामुळे अनेक सैनिक भारतात आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com