होय, त्यादिवशी काश्मीरमध्ये दगडफेक झाली पण...

Kashmir
Kashmir

नवी दिल्ली : कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरमध्ये अशांतता असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसारित केले होते. यावर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की होय, 9 ऑगस्टला काश्मीरमध्ये दगडफेक झाली पण ती बाहेरुन आलेल्या नागरिकांनी केली.

केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा केला होता. तर, बीबीसी या वृत्तवाहिनीने श्रीनगरजवळील सौरा भागात 9 ऑगस्टला सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. अखेर यावर गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की 9 ऑगस्टला सौरा भागातील मशिदीतून स्थानिक लोक घरी परतत असताना त्यामध्ये बाहेरचे लोक मिसळले. त्यांनी सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक केली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

दरम्यान, या विषयावरून सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील नेटिझन्सने बीबीसीला या वृत्तवाबद्दल ट्रोल केले होते. #IndiaVsFakeNews हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. तसेच बीबीसी पाकिस्तान इतका गुलाम झाला आहे, तो पाकिस्तान टीव्ही सिस्टर ऑर्गनायझेशनसारखा काम करत असल्याचे म्हटले होते. आता गृहमंत्रालयानेच दगडफेक झाल्याचे मान्य केल्याने बीबीसीने दिलेले वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, ही दगडफेक कोणी केली हेही महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com