सरकार पडले तर पडू दे, मला भीती नाही; कृषी कायद्याविरोधात अमरिंदर सिंग कडाडले

amarinder singh main.jpg
amarinder singh main.jpg

चंदीगड- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी विधानसभेत कृषी कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले आहे. हे विधेयक सादर करताना त्यांनी भावूक भाषणही केले. त्यांनी विरोधी पक्ष अकाली दलवरही निशाणा साधला. माझे सरकार पडले तर पडू दे. मला याची भीती नाही. पण मी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर असेल, असे त्यांनी ठामपणे विधानसभेत सांगितले.

केंद्राचा कृषी कायदा शेतकरी आणि भूमीहीन मजुरांच्या हिताविरोधी असल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले. यादरम्यान त्यांनी तीन विधेयके विधानसभेत सादर केली. यात शेतकऱ्यांच्या उत्पादन सुविधा कायद्यात दुरुस्ती, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा, शेतकरी करार आणि कृषी सेवा कायद्यात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले. 

विधेयक सादर करताना अमरिंदर सिंग म्हणाले की, मला सरकार पडण्याची भीती नाही. मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. यापूर्वीही पंजाबसाठी मी राजीनामा दिला होता. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून उभे आहोत. कृषी दुरुस्ती विधेयक आणि प्रस्तावित विद्युत विधेयक दोन्हीही शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी घातक आहे. 

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी विधानसभेच्या विशेष सत्रादरम्यान दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908 मध्ये दुरुस्तीसाठी एक विधेयक सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कृषी अध्यादेश आणि विद्युत कायद्यातील संशोधनाविरोधात एक प्रस्ताव ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com