'मला पूर्ण काम द्या, नाहीतर दुसऱ्या राज्यात बदली करा'; भाजप आमदाराचं नाव घेत IAS अधिकाऱ्याचं सरकारला पत्र

IAS Rinku Singh Rahi seeks transfer from UP : मुख्य सचिव (नियुक्ती व कार्मिक) यांना पाठवलेल्या पत्रात रिंकू सिंह यांनी म्हटलं आहे की, सध्या त्यांच्याकडून दिवसातून केवळ चार तासच काम करून घेतलं जात आहे. त्यामुळे पूर्ण पगार घेणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही.
IAS Rinku Singh Rahi seeks transfer from UP

IAS Rinku Singh Rahi seeks transfer from UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील चर्चेत असलेले आयएएस अधिकारी रिंकू सिंह राही पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. सध्या जालौन येथे संयुक्त दंडाधिकारी (जॉइंट मॅजिस्ट्रेट) म्हणून कार्यरत असलेल्या रिंकू सिंह यांनी राज्य सरकारला तब्बल पाच पानांचं पत्र लिहित प्रशासनाच्या कामकाजावर आणि स्वतःच्या नियुक्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, "जर माझ्याकडून अर्धंच काम घेत असाल तर मला अर्धाच पगार द्या," अशी आगळीवेगळी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com