Increasing number of lonely people in India
Increasing number of lonely people in India

भारतात एकाकी वयोवृद्धांची संख्या वाढती

नवी दिल्ली : भारताची लोकसंख्येने एक अब्जचा टप्पा ओलांडला असला आहे. लोकसंख्येच्या स्फोटात वयोवृद्धांचे हाल कोणीच विचारत नाही, अशी स्थिती आहे. ते जास्त एकाकी पडत असल्याचे नुकत्याच केलेल्या एका पाहणीत दिसून आले. 
दिल्लीमधील "एजवेल फाउंडेशन' या बिगर सरकारी संस्थेने भारतातील 20 राज्यांधील 10 हजार ज्येष्ठांचा आढावा घेतला. या वर्षी मे व जून महिन्यात केलेल्या सर्व्हेत एकूण ज्येष्ठांपैकी प्रत्येक चौथी व्यक्ती (23.44 टक्के) ही देशात एकाकी जीवन जगत असल्याचे आढळून आले. 

तसेच प्रत्येक दुसरी ज्येष्ठ व्यक्ती (48.88 टक्के) हे पती किंवा पत्नीसह राहत असून 26.5 टक्के ज्येष्ठ मुले व कुटुंबासह राहत असल्याचे या पाहणीत आढळले आहे. शहरी भागातील स्थिती जास्त गंभीर आहे. तेथे 25.3 टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. हे प्रमाण ग्रामीण भागात 21.38 टक्के आहे. 

अनेक ज्येष्ठांचा कल एकटे किंवा पती/पत्नीसह राहण्याकडे असल्याची आश्‍चर्याची बाबही या पाहणीत आढळली. ते त्यांचे स्वतंत्र राहण्याचा आनंद घेत असले तरी आर्थिकदृष्ट्या ते इतरांवर अवलंबून असतात. ही बाब त्यांच्यादृष्टीने अडचणीची ठरते. आयुष्याची संध्याकाळ सुखात घालविण्यासाठी केवळ 36.81 टक्के ज्येष्ठ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहेत, असा दावा अहवालात केला आहे. 

ज्येष्ठांची स्वयंपूर्तता... (आकडे टक्‍क्‍यांत) 
68.25 
वैचारिक स्वातंत्र्य 

60.54 
मानसिक स्वातंत्र्य 

69.54 
सामाजिक स्वातंत्र्य 

61.81 
शारीरिक स्वातंत्र्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com