Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने मंगळवारी उशिरा रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलीये. या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलंय, की ‘ऑपरेशन सिंदूर’चे उद्दिष्ट केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करणे होते. भारताने हा हल्ला शेजारील देशासोबत वाद घालण्यासाठी केलेला नाहीये, असं स्पष्ट करण्यात आलंय.