

India Ethiopia ties from ancient trade at Adulis port to modern diplomacy
Esakal
प्रत्येक नात्याला नाव हवंच असं काही नाही. काही नाती ही ना कुठे लिहिलेली नसतात ना त्या नात्यात कोणता करार असतो. मात्र ती नाती माणसांच्या रक्तात, भाषेत, संगीतात आणि आठवणीत असतात. भारताचं इथिओपियाशी असलेलं नातंही असंच आहे. दोन हजार वर्षांपूर्वी सुरू झालेले संबंध आजही ताजेतवाने असे आहेत.