why toll rates increase every year in India
esakal
बंगळूर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरांमध्ये एक एप्रिलपासून वाढ होणार (India Toll Hike April 1) असून, वाहनचालकांना पुन्हा एकदा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. राज्यातील नऊ महामार्गांवर ही टोल वाढ असेल. टोलदर वाढीचा दर सुमारे ४ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही दरवाढ मोटार, बस, ट्रक यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना लागू होणार आहे.