Pahalgam Attack : संयुक्त चौकशीची मागणी वेळकाढूपणाची, परराष्ट्र सचिवांनी फेटाळला पाकचा प्रस्ताव

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या संयुक्त चौकशीच्या प्रस्तावाला भारताने ठामपणे नकार दिला असून, यामागील इतिहास पाहता पाकिस्तानचा हेतूच संशयास्पद असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.
Pahalgam Attack
Pahalgam AttackSakal
Updated on

नवी दिल्ली : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताला अमान्य असल्याचे स्पष्ट केले. ‘‘२६/११चा मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि पठाणकोटमधील हवाई दळाच्या तळावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुरावे देऊन ही कारवाई झाली नाही. पठाणकोटमध्ये अभूतपूर्व निर्णयातून पाकिस्तानी यंत्रणांना जैशे महंमदविरुद्धही पुरावे दिले होते. परंतु संयुक्त चौकशी व दोषींवरील कारवाईबाबतचा पाकिस्तानचा इतिहास विश्वासार्ह नाही. त्यामुळे आताची संयुक्त चौकशीची मागणी वेळकाढूपणा करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी आहे,’’ असे म्हणत परराष्ट्र सचिवांनी फटकारले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com