
नवी दिल्ली : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताला अमान्य असल्याचे स्पष्ट केले. ‘‘२६/११चा मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि पठाणकोटमधील हवाई दळाच्या तळावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला पुरावे देऊन ही कारवाई झाली नाही. पठाणकोटमध्ये अभूतपूर्व निर्णयातून पाकिस्तानी यंत्रणांना जैशे महंमदविरुद्धही पुरावे दिले होते. परंतु संयुक्त चौकशी व दोषींवरील कारवाईबाबतचा पाकिस्तानचा इतिहास विश्वासार्ह नाही. त्यामुळे आताची संयुक्त चौकशीची मागणी वेळकाढूपणा करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी आहे,’’ असे म्हणत परराष्ट्र सचिवांनी फटकारले.