

India and South Africa shared history of struggle sacrifice and friendship
Esakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संबंधाची चर्चा होते तेव्हा ती फक्त दोन देशांचे राजकीय, रणनितीक संबंधापुरतेच ते मर्यादीत नसतात. दोन्ही देशांचे संबंध या पलिकडे आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातलं नातं रक्ताचं, कष्टाचं, घामाचं आणि तुरुंगांच्या चार भिंतीत आयुष्य जगलेल्या माणसांच्या स्वप्नांचं आहे. एकीकडे महात्मा गांधी आणि दुसरीकडे नेल्सन मंडेला, या दोघांच्या मधे एक शतकभराच्या आठवणी आहेत ज्या आजही दोन्ही देशवासियांच्या मनावर राज्य करतात.