

Strait of Hormuz on Edge: India Monitors Escalating Maritime Crisis
eStrait of Hormuz on Edge: India Monitors Escalating Maritime Crisis
होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारताने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी इराणी राजदूतांसह अनेक इराणी राजनैतिक अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून सहा भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.