

टांझानिया आणि भारत यांच्यातले संबंध मान्सूनच्या येण्या-जाण्याने जोडले गेलेत असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. नैऋत्य मान्सून फक्त पाऊसच नाही तर या दोन देशांमध्ये असलेल्या अनेक शतकांचा इतिहासही घेऊन येतो. गुजरातच्या कच्छ, काठियावाड या बंदरांमधून निघणारी व्यापारी जहाजं मान्सूनच्या वाऱ्यासोबत थेट झांजिबारच्या किनारपट्टीला पोहोचायची. तिथून परत येताना याच वाऱ्याच्या प्रवासाहोबत मायदेशी यायचे. दोन्ही देशांना जोडणारा नैसर्गिक मार्ग हिंदी महासागरातून यायचा. Tanzania and India A Bond Built By Monsoon Winds