
India Responds Strongly to Pakistan’s Provocative Remarks: पाकिस्तानच्या सततच्या भारतविरोधी विधानांना सडेतोड प्रत्युत्तर दिले गेले आहे. कोणत्याही चुकीच्या पावलासाठी त्याला वेदनादायक आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या या विधानांना एक ठरवलेली रणनीती म्हटले आहे, ज्याचा उद्देश भारतविरोधी वातावरण निर्माण करणे आणि त्यांच्या अपयशांवरून सर्वांचे लक्ष विचलित करणे आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही पाकिस्तानकडून सतत भारतविरोधी विधाने ऐकत आहोत, युद्धाला भडकवणारी विधाने पाहिली आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी गोष्टी बोलणे हा पाकिस्तानी नेतृत्वाची पद्धत आहे. पाकिस्तानला त्यांच्या वक्तव्यांवर आवर घालण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कोणतेही दुस्साहस केले तर परिणाम वाईट असतील.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची ही गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या इशाऱ्यानंतर आली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी मंगळवारी इशारा दिला होता की, भारताला त्यांच्या देशातून एक थेंबही पाणी घेवू दिले जाणार नाही. १९६०चा सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे हे विधान आले आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी ते माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतविरोधी विधाने केली होती. त्यांनी सिंधू जल कराराच्या निलंबनाची तुलना सिंधू संस्कृतीवरील हल्ल्याशी केली आणि इशारा दिला की जर आपल्याला युद्ध करण्यास भाग पाडले गेले तर पाकिस्तान मागे हटणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.