
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘तेजस’पाठोपाठ पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या (एएमसीए) निर्मिती प्रकल्पास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. देशातील एअरोस्पेस औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. या प्रकल्पासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येईल.