Shashi Tharoor
Shashi Tharoor Sakal

Shashi Tharoor : सद्य:स्थितीत भारत पहिले पाऊल टाकणार नाही; पाकिस्तानशी शांतता चर्चेबाबत खासदार शशी थरूर यांचे मत

India-Pakistan Relations : पाकिस्तानकडून वारंवार झालेल्या विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर भारताने कारवाईतूनच उत्तर दिले असून, आता संबंध सुधारण्यासाठी पहिले पाऊल पाकिस्ताननेच टाकावे, असे शशी थरूर यांनी म्हटले.
Published on

नवी दिल्ली : ‘‘भारत आता स्वत:हून पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यास उत्सुक नाही. कारण सतत विश्‍वासघात आणि फसवणुकीचाच अनुभव आल्याने भारताने कारवाईतूनच चोख उत्तर दिले,’’ असे काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांची पाठराखण करणे थांबवावे आणि संपूर्ण जाळे नष्ट करून जगासमोर प्रामाणिकपणा सिद्ध करावा, असेही थरूर म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com