भारताने पुन्हा एकदा घुसून मारले; पुलवामाचा बदला

mirage
mirage

नवी दिल्ली : आमच्याकडे असलेली शस्त्रे शोभेसाठी नसून, ती वापरण्याची ताकद आमच्यामध्ये असल्याची ताकद भारताने पुन्हा एकदा दाखवत पाकिस्तानमध्ये घुसून पुन्हा एकदा हल्ला केला आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा हा बदला असल्याचे बोलले जात आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण होते. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने एलओसी ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1000 किलो वजनाचा बॉम्बहल्ला केला. मिराज ही भारतीय हवाई दलातील 10 विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हा हल्ला केला. 

नुकतीच काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. त्यानंतर काहीतरी कारवाई होईल असे सांगण्यात येत होते. अखेर हवाई दलाने आज पहाटे साडेतीनच्या सुमारास कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com