AI Impact Summit
sakal
नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगातील पाचवी क्रांती असून ‘एआय’ तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला येत्या दोन वर्षांत २०० अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितले. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान परिसंस्थेबाबत जगभरात व्यापक औत्सुक्य असल्याचेही वैष्णव यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.