KCR : इंदिरा गांधींचे राज्य म्हणजे आणीबाणी; केसीआर यांची टीका

‘इंदिरा गांधी यांचे राज्य म्हणजे खून, एन्काउंटर, आणीबाणीचे राज्य होते,’ असा दावा करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
KCR
KCRsakal

नवी दिल्ली - ‘इंदिरा गांधी यांचे राज्य म्हणजे खून, एन्काउंटर, आणीबाणीचे राज्य होते,’ असा दावा करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्याबद्दल तेलंगणातील जनतेमध्ये विशेष प्रेम असून, तेथे त्यांना इंदिराअम्मा म्हणून ओळखले जाते.

काँग्रेसने या प्रतिमेचा प्रचारात उपयोग केला, परंतु आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राव यांनी इंदिरा गांधी यांच्यावर पुन्हा टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून सातत्याने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचा उपयोग तेलंगणच्या प्रचारात केला जात आहे. प्रत्येक सभांमध्ये इंदिराअम्मा यांचे ‘राज्यम’ तेलंगणात आणले पाहिजे, असे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी प्रामुख्याने इंदिराअम्मा राज्यम आणण्याचे आश्वासन तेलंगणच्या जनतेला प्रचाराच्या माध्यमातून देत आहेत.

१९७७ मध्ये पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी तेलंगणातील मेडक या मतदारसंघातूनच निवडणूक लढविली होती. यामुळे व इंदिरा गांधी यांच्याबद्दल तेलंगणातील लोकांमध्ये विशेष प्रेम आहे.

‘इंदिराअम्मा राज्यम’च्या प्रचारामुळे लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असतानाच आता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘इंदिराअम्मा राज्यम’ काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘‘इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली. त्यांच्यामुळे एन. टी. रामाराव यांचे सरकार पडले होते,’ असे दाखलेही मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिले.

तेलंगण राज्याची निर्मिती राज्यातील सर्व प्रदेश आणि जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी करण्यात आली होती. पण नऊ वर्षांनंतर केवळ हैदराबादभोवतीच विकास सुरू असल्याचे दिसत आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात आली; मात्र नऊ वर्षांनंतर देशातील सर्वात जास्त तरुण बेरोजगारी तेलंगणात असल्याचे चित्र आहे. नऊ वर्षांपासून राज्यावर केसीआर, त्यांचा मुलगा, पुतणे आणि मुलगी यांचेच नियंत्रण आहे.

- जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com