भारतीय मानसिकतेत स्थित्यंतर हवे ः मूर्ती

निवारा, पोषणमूल्यांचा प्रश्न अधिक गंभीर
Technocrat N R Narayan Murthy
Technocrat N R Narayan Murthy

बंगळूर - पोषणमूल्ये आणि निवाऱ्यासारख्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यापासून भारत आणखी कोसो दूर असून त्यासाठी भारतीय मानसिकतेमध्ये मोठे सांस्कृतिक स्थित्यंतर घडवून आणणे गरजेचे असल्याचे मत आघाडीचे टेक्नोक्रॅट एन. आर. नारायणमूर्ती यांनी मांडले. ते येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इन्फोसिस सायन्स फाउंडेशन’च्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सध्या भारताला भेडसावणाऱ्या या सर्वांत मोठ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन योद्धे तैनात करावे लागतील, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

मूर्ती म्हणाले, ‘‘आपला देश वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे. आपण अंतराळामध्ये रॉकेट आणि उपग्रहे देखील पाठविली. आपण पोलाद, ऊर्जा प्रकल्पाबरोबरच मोठी धरणे देखील उभारली आहेत. आपण कोरोना प्रतिबंधक लस देखील तयार केली. ह्रदय आणि मूत्राशयाच्या प्रत्यारोपणामध्ये आपल्याला मोठे यश आले आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, पोषणमूल्ये आणि निवाऱ्यासारख्या १.४ अब्ज भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यापासून मात्र अद्याप आपण कोसो दूर आहोत.’’

मानवी मनाची क्षमता मोठी

मानवी मनाच्या क्षमतेशिवाय कोणत्याही देशाने गरिबी, आरोग्य, पोषणमूल्यांसारख्या समस्यांचे निराकरण केलेले दिसत नाही. याशिवाय त्यांना आर्थिक संपन्नता देखील मिळविता आलेली नाही असे सांगतानाच मूर्ती यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष थिऑडोर रूझवेल्ट यांच्या विधानाचा दाखला दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com