

Jharkhand Paperleak
esakal
झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित भ्रष्टाचार आणि पेपर लीकविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने १० ऑगस्ट रोजी उग्र रूप धारण केले. हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे मोर्चा काढत सुरक्षा व्यवस्था भेदली आणि विधानसभेच्या गेट क्रमांक १ पर्यंत धडक मारली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, पाण्याचा मारा आणि अश्रूधुराचा वापर केला.